विदर्भ आणि मराठवाडा हे महाराष्ट्रातील दोन मागासलेले प्रदेश आहेत. कापूस, सोयाबीन, तूर ही येथील प्रमुख पिके आहेत. कर्जबाजारीपणामुळे राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या या दोन भागांमध्ये झाल्या आहेत. त्यांच्या कर्जाच्या संकटातून बाहेर येण्यासाठी त्यांच्या पिकांची घोषित किमान आधारभूत किंमतीवर (MSP वर) खरेदीची हमी सुनिश्चित करण्याची गरज आहे.
अखिल भारतीय किसान सभेच्या (AIKS) महाराष्ट्र युनिटने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर आणि MSP ची आवश्यकता यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी दोन शेतकरी अधिवेशने आयोजित केली होती. मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे 7 मार्च 2024 रोजी MSP च्या अधिकारावरील पहिले अधिवेशन आयोजित करण्यात आले होते आणि त्यात 1000 हून अधिक शेतकरी उपस्थित होते. MSPच्या अधिकारासाठी दुसरे अधिवेशन 7 एप्रिल 2024 रोजी वर्धा येथे झाले. यात विदर्भातील वर्धा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 800 हून अधिक शेतकरी सहभागी झाले होते.
वर्धा अधिवेशनातील सर्व वक्त्यांनी MSP च्या महत्त्वाच्या मुद्यासह कर्जमाफी, पीक विमा, वीज, पेन्शन आणि इतर यासारखे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे मुद्दे प्रस्तुत केले. देशातील संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि राज्यातील AIKS च्या नेतृत्वाखालील या आणि इतर मुद्द्यांवर अलीकडच्या काळात झालेल्या मोठ्या संघर्षांचा संदर्भ देत, त्यांनी या शेतकरी मागण्यांसाठी सतत संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहन
